जनावरांना उष्णतेच्या (ऑक्टोंबर हीट) तानापासून जपा

ऑक्टोंबर महिन्यात वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते व हे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शरीरातील उष्णता शरीर क्रियेचा वेग वाढून शरीराबाहेर टाकावी लागते, त्यामुळे शरीरावर ताण पडतो आणि जनावरांची बरीचशी उर्जा यावर खर्च होते. जनावरे पाणी कमी पितात व चारा किंवा खाद्य कमी प्रमाणात खातात म्हणून ऑक्टोंबर मध्ये आपल्याला जनावरांचे दूध कमी झालेले दिसते. तसेच दुधाला फॅट व एसएनएफ (SNF) न लागणे हे जाणवते.

उष्णतेच्या ताणामुळे जनावरांना होणारा प्रमुख आजार म्हणजे उष्माघात

त्याची लक्षणे खालील प्रमाणे दिसतात:

  1. जनावरे अस्वस्थ होतात व जनावरांची तहान आणि भूक मंदावते
  2. जनावरांच्या शरीराचे तापमान वाढते
  3. जनावरांचा श्वासाच्छासाचा दर वाढवून जनावरांना धाप लागते
  4. जनावरांचे डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळते
  5. जनावरे मोठ्या प्रमाणामध्ये लाळ गाळतात त्यामुळे असिडोसिस होऊन अपचन होते
  6. जनावरांचा अतिसार होतो
  7. लघवीचे प्रमाण कमी होते
  8. जनावरे बसून असतात
  9. जनावरे गाभ जात नाही किंवा गाभण गाई गाभडण्याचे प्रमाण वाढते

उपचार

  1. जनावरांना थंड पाण्याने स्वच्छ धुऊन काढावे, झाडाच्या सावलीत अथवा इतर ठिकाणी बांधावे. गोठ्यासाठी सिमेंटच्या पत्र्यांचा वापर केला असल्यास त्यावर पाचट टाकावे किंवा आतील बाजूस चुना मारवा.
  2. जनावरांना नेहमीत थंड पाणी उपलब्ध असेल याची व्यवस्था करावी आणि सोबत इलेक्ट्रोवेट पावडर 2.5 ग्रॅम प्रति लिटर दररोज द्यावी.
  3. आहारा मधून वाढीव खनिज मिश्रण द्यावे
  4. जनावरांना दुपारच्या वेळेस चरण्यासाठी पाठवू नये किंवा खायला टाकू नये
  5. उष्णतेच्या ताणामुळे माजाचा कालावधी कमी असतो बऱ्याच वेळा जनावरे मुका माज दाखवतात. म्हैशी मध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढळते. त्यासाठी जनावराचे सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा बारकाईने निरीक्षण करून माजाची लक्षणे पहाणे. माजावर आलेली जनावरे दुपारच्या वेळेस न भरता त्याऐवजी ते सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजेच उन्हाची तीव्रता कमी झाल्यानंतर भरावी व अश्या जनावरांच्या आहारात नियमित इलेक्ट्रोवेट पावडर द्यावी.

इलेक्ट्रोवेट नियमित वापरल्याने

उष्णतेच्या तान ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाणावर नियंत्रण ठेवून दूध उत्पादन क्षमता टिकूईट, मिनरल्स, व विटामिन सी युक्त एक झटपट ऊर्जा देणारे सर्वोत्तम उत्पादन

  1. उष्णतेचा ताण कमी होतो
  2. जनावरे पाणी जास्त प्रमाणात पितात
  3. जनावरे चारा जास्त प्रमाणात खातात
  4. जनावरांचे दूध उत्पादन क्षमता टिकून राहते
  5. फॅट व एसएनएफ टिकून राहते
  6. जनावरांना धाप लागत नाही
  7. जनावरे गाभ जातात

डॉ. के. आर. शिंगल

पूर्व प्रादेशिक सह आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र सरकार
ईमेल आयडी: drkrshingal@gmail.com